X Close
X
9819022904

राजा राममोहन रॉय


Mumbai:

राजा राममोहन रॉय भारतीय समाजसुधारक होते. त्यांचा जन्म बंगालमधील हुगळी गावातील ब्राह्मण कुटुंबात २२ मे १७७२ रोजी झाला. त्या काळात प्रशासनासाठी वापरली जाणारी भाषा पार्शियन व अमेरिकन होती. त्यामुळे पार्शियन व अरेबिक शिकण्यासाठी त्यांना पाटणा येथे पाठविण्यात आले. त्यानंतर ते बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी तिबेट व बनारसला गेले. पार्शियन व अरेबिक भाषेत त्यांनी वेदांत ग्रंथ हे पहिले पुस्तक लिहिले. १८१५ मध्ये कोलकाता येथे परतल्यावर त्याचे बंगाली भाषेत रूपांतर (भाषांतर) केले. त्यांना ‘राजा’ ही पदवी मुघल सम्राट अकबर ‘द्वितीय’ याने बहाल केली. मुघल सम्राटचे राजदूत म्हणून ते इंग्लंडला गेले होते. भारतातून इंग्लंडला जाणारे ते पहिले भारतीय होते. राजा राममोहन रॉय यांना भारतात नव विचाराचे जनक म्हटले जातात. त्यांनी सर्वप्रथम ‘ब्रह्मपत्रिका’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले. ते पहिले उच्चशिक्षित व्यक्ती होते. ते भारतातून इंग्लडला गेले. त्यांनी मूर्तीपूजेला, देवदेवतांच्या पूजेला विरोध केला. जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे व तो निर्गुण, निराकार आहे, असे ते मानत होते. हिंदू धर्मातील कालबाह्य झालेल्या रूढी व परंपरांना त्यांचा विरोध होता. भारतातील समाजाला नवी दिशा देणे, ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी १८३० साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली.