जामनगर : गुजरातमधील निलंबित माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोठडीतील आरोपीचा मृत्यू झाल्याप्रकरणी जामनगर न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. संजीव भट्टसह अजून एक पोलीस अधिकारी प्रवीण सिंह यालाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
संजीव भट्ट जामनगरमध्ये पोलीस अधीक्षकपदी असताना १९९० मध्ये भारत बंददरम्यान हिंसाचार झाला होता. त्यासंदर्भात ११३ लोकांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत एक आरोपी प्रभुदास माधवजी वैश्नानीचा मृत्यू झाला होता.
Jamnagar Sessions Court sentences former IPS officer Sanjeev Bhatt to life imprisonment under IPC 302 in 1990 custodial death case. #Gujarat pic.twitter.com/KMkrdDQGlr
— ANI (@ANI) June 20, 2019
संजीव भट्ट आणि सहाकाऱ्यांवर आरोपीला कोठडीत मारहाण करण्याचा आरोप करण्यात आला होता. पण गुजरात सरकारने खटला चालवण्याची परवानही दिली नव्हती. अखेर २०११ मध्ये राज्य सरकारने संजीव भट्ट याच्याविरोधात खटला चालवण्याची परवानगी दिली.
बुधवारी १२ जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने संजीव भट्टच्या याचिकेवर पुनर्विचार करण्यास नकार दिला होता. भट्ट याने याचिकेत ११ साक्षीदारांची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली होती. २०११ मध्ये कोणतीही परवानगी न घेता कर्तव्यावर गैरहजर राहिल्याने तसंच सरकारी वाहनांचा गैरवापर केल्याप्रकरणी संजीव भट्टवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यानंतर ऑगस्ट २०१५ मध्ये निलंबन करण्यात आले होते.
(PRAHAAR)