X Close
X
9819022904

महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करणा-याला मंत्रिपद दुर्दैवीच : माजी खा. निलेश राणे


Mumbai:

प्रहार वेब टीम

मुंबई : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात १३ युतीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना आमदार तानाजी सावंत यांना मिळालेल्या मंत्रीपदावरून शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करणारा व्यक्ती मंत्री होत असेल तर यापेक्षा राज्याचे दुर्दैव काय असेल? असे निलेश राणे म्हणाले.

रविवारी मंत्रिमंडळ विस्तारात शिवसनेच्या दोन आमदारांना मंत्रीपद देण्यात आले आहे. त्यात, विधान परिषदेचे आमदार तानाजी सावंत यांचा समावेश आहे. सावंत यांना मिळालेल्या मंत्रीपदावरून निलेश राणेंनी शिवसेनचा  समाचार घेतला आहे. महाराष्ट्राला भिकारी बनवण्याचे वक्तव्य करणा-या व्यक्तीला जर मंत्रिमंडळात संधी मिळत असेल तर, महाराष्ट्राचे यापेक्षा मोठ दुर्दैव कोणते असेल, असेही राणे म्हणाले.

२०१७ मध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील प्रचारादरम्यान, ‘सव्वाशे-दीडशे कोटींचा कारखाना खरेदी करायला मला फारसे काही लागत नाही. काही लोकांचा गैरसमज झाला असेल की तानाजी सावंत भिकारी-बिकारी झालाय. पण तसे काही नाही. हा गैरसमज काढून टाका. मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, पण तानाजी सावंत कधीही भिकारी बनणार नाही,’ असे सावंत म्हणत असल्याचे व्हिडिओ समोर आले होते. त्यानंतर त्यांचावर मोठ्याप्रमाणात टीका सुद्धा झाली होती. निलेश राणेंनी आपल्या ट्विटर अकाऊन्ट वरून सावंत यांच्या त्या वक्तव्याचा व्हिडिओ सुद्धा शेयर केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून शिवसेेनेत आलेल्या २ नेत्यांना  कॅबिनेट मंत्रीपद मिळाले असले तरीही, ते दोन्ही नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून आलेले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव हे कसले पक्षप्रमुख आहे, त्यांच्या पक्षातील लोकांची त्यांना खात्री नाही. अशा शब्दात निलेश राणे यांनी उद्धव यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. यावरून सेनेची चांगलीच गोची झाली आहे.