पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात नेहमीप्रमाणेच मुलींनी बाजी मारली. विभागनिहाय आकडेवारीत कोकण अव्वल स्थानी आहे. तर नागपूरचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
राज्यातील एकूणच निकालाची टक्केवारी ८५.८८ टक्के आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलीचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणा मुलांपेक्षा ७.८५ टक्के अधिक आहे. मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे आणि सचिव डॉ. अशोक भोसले यांनी ही माहिती दिली. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी एक वाजता सर्व निकाल पाहता येतील.
राज्यातील तब्बल ४४७० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. यंदा १२ वीच्या परीक्षेला राज्यभरात एकूण १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या ८ लाख ४२ हजार ९१९ तर विद्यार्थिनींची संख्या ६ लाख ४८ हजार १५१ इतकी होती.
– कोकण ९३.२३ टक्के
– पुणे ८७.८८ टक्के
– अमरावती ८७.५५ टक्के
– औरंगाबाद 87.29 टक्के
– कोल्हापूर ८७.१२ टक्के
– लातूर ८६.०८ टक्के
– नाशिक ८४.७७ टक्के
– मुंबई ८३. ८५ टक्के
– नागपूर ८२.५१ टक्के
शाखेनुसार विचार करता यंदा विज्ञान शाखेचा निकाल ९२. ६० टक्के, वाणिज्य शाखेचा ८८. २८ टक्के आणि कला शाखेचा निकाल ७५.४५ टक्के लागला आहे.
विद्यार्थ्यांना दुपारी १ पासून मंडळाच्या पुढील अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
गुण पडताळणीसाठी २९ मे ते ७ जून आणि छायाप्रतीसाठी २९ मे ते १७ जून या या कालावधीत अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक आहे.
बारावीच्या निकालात घसरण
राज्याचा निकाल ८५.८८ टक्के असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २.५३ टक्क्यांनी निकाल घसरला. एकूण १२ लाख २१ हजार १५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील ४ हजार ४४० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.
(PRAHAAR)