मुंबई : काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रियंका गांधी या शुक्रवारी सोनभद्र या ठिकाणी पीडितांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
‘तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही झुकणार नाही. मी हिंसाचारात बळी गेलेल्या पीडितांना भेटण्यासाठी आले असून मला अटक करण्यात आली आहे’ असं प्रियंका गांधी म्हणाल्या. मात्र प्रियंका यांना अटक करण्यात आली नसून ताब्यात घेण्यात आले असल्याचे डीजीपींनी सांगितले.
सोनभद्र या ठिकाणी जमिनीच्या वादातून १० जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात बळी गेलेल्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रियंका यांनी सोनभद्र या ठिकाणी भेट दिली. पोलिसांना ताब्यात घेतल्यानंतर पीडितांच्या नातेवाईकांना भेटण्यात गैर काय? असा प्रश्न प्रियंका यांना विचारला.
(PRAHAAR)