X Close
X
9819022904

पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी प्रत्यक्ष मदत १५०० कोटींचीच


Assam flood-PO66Y6T

मुंबई (प्रतिनिधी) : पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी प्रत्यक्ष मदत १५०० कोटी रुपयांचीच आहे, असे सांगताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या पॅकेजवर टीका केली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकणासह राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने ११ हजार ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली असली, तरी याचे विश्लेषण पाहता केवळ १५०० कोटी रुपयांचीच तातडीची मदत केलेली दिसून येते. पुनर्बांधणीचे ३ हजार कोटी आणि सौम्यीकरण उपाययोजनांचे ७ हजार कोटी असे १० हजार कोटी रुपये हे दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये मोडतात. त्यामुळे प्रत्यक्ष मदत ही १५०० कोटी रुपयांचीच दिसून येते, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकणासह राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने ११,५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली असली तरी याचे विश्लेषण पाहता केवळ १५०० कोटी रुपयांचीच तातडीची मदत केलेली दिसून येते. तसेच, “राज्य सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकाचे अवलोकन केले असता शेती पिकांचे नुकसान, अन्नधान्य पुरवठा, स्वच्छता अनुदान, घरांसाठी वाळू-मुरूमची उपलब्धता, अशा २०१९ मध्ये देण्यात आलेल्या अनेक मदतींचा त्यात उल्लेख दिसून येत नाही,” असं फडणवीसांनी सांगितले.

राज्य सरकारच्या प्रसिद्धीपत्रकाचे अवलोकन केले असता शेती पिकांचे नुकसान, अन्नधान्य पुरवठा, स्वच्छता अनुदान, घरांसाठी वाळू-मुरूमची उपलब्धता अशा २०१९मध्ये देण्यात आलेल्या अनेक मदतींचा त्यात उल्लेख दिसून येत नाही. याचबरोबर, “या मदतीबाबतचा विस्तृत शासन आदेश जारी झाल्यानंतर याबाबतची स्पष्टता आल्यानंतरच सविस्तर प्रतिक्रिया देता येईल. प्रथमदर्शनी शेतकऱ्यांसारख्या महत्त्वाच्या घटकाला कुठलीही मदत केलेली दिसून येत नाही.” अशी टिप्पणी फडणवीस यांनी सरकारच्या मदती संदर्भात केली आहे.

 

(PRAHAAR)