X Close
X
9819022904

निलेश राणे यांनी चिमुकल्यांना दिल्या ‘ईद’च्या शुभेच्छा


nilesh-300x166
चिपळूण : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस आणि माजी खासदार निलेश राणे रत्नागिरी दौऱ्यावर असताना बुधवारी रमजान ईदनिमित्त त्यांनी गावकरयांची भेट घेतली. रत्नागिरी, लांजा, राजापूर येथील मुस्लिम बांधवांना तसेच जिल्हा चिटणीस इलियास बंदरी यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी निलेश राणे आले समजताच लहान-लहान मुले देखील त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरू शकले नाहीत. निलेश राणे यांनी हस्तांदोलन करीत चिमुकल्यांना शुभेच्छा दिल्या. लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. पराभव झालेले नेते आपल्या मतदारसंघात फारसे काही दिसत नाहीत. मात्र, निलेश राणे पराभवाच्या मानसिकतेत न राहता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात येऊन जनतेच्या सहवासात राहून लोकांची मने जिंकत आहेत. कोकणचा विकास करणे हेच आमचं ध्येय्य असल्याने कोकणच्या जनतेला आम्ही वाऱ्यावर सोडू शकत नाही, असे ठामपणे निलेश राणे नेहमी आपल्या पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि सहकारी यांना सांगतात. निवडणुका येतील, जातील; हार-जीत होत राहिल परंतु आमचा संघर्ष कोकण जिंकला पाहिजे यासाठी सुरुच राहणार, असे निलेश राणे यांनी सांगितले. (PRAHAAR) ()