पुणे (प्रतिनिधी) : नागरिकांच्या सहकार्याशिवाय कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविता येणे शक्य नाही. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सामुहिक प्रयत्नातून मात करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले़
पुणे महानगरपालिका, भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन झिरो पुणे’ या उपक्रमाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले, पुणे शहरामध्ये कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ‘मिशन झिरो पुणे’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सार्वजनिक हितासाठी या उपक्रमात भारतीय जैन संघटना ही पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करत आहे, ही चांगली बाब आहे. अशावेळी कोरोनाच्या लढ्यात सामान्य नागरिकांनीही साथ देणे आवश्यक आहे.
(PRAHAAR)