नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या भारतात १६ वर पोहोचली आहे. तर एका दिवसात देशभरात ८० नवीन लोकांनी संक्रमण झाल्याची धक्कादयक माहिती समोर येत आहे. शुक्रवारी सकाळी ७ पर्यंत देशभरात ६९४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारे आकडे भीती आणि चिंता निर्माण करणारे आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारत अजूनही दुसºया टप्प्यात आहे. कोरोना व्हायरसचा होणारा परिणाम लक्षात घेता भारत अजून तिसºया टप्प्यात पोहोचला नाही ही दिलासा देणारी गोष्ट आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आला असून लोकांनाही घराबाहेर न पडण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे.
महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी आणखी ५ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून आता ही संख्या १३० वर पोहोचली आहे. मध्य प्रदेशात गुरुवारी कोरोनामुळे ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर २१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यात भोपाळमध्ये २, ग्वाल्हेरमध्ये १, शिवपुरी १, इंदूर १०, उज्जैन १ आणि जबलपूरमध्ये ६ रुग्ण आढळून आले आहेत. राजस्थानमध्येही एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
(PRAHAAR)