आळंद : देवदर्शनावरून परतताना सोलापूरातील पाच जणांचा अपघातात ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. गुलबर्गाजवळील आळंद येथे मंगळवारी पहाटे अपघात झाला. यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूरचे पाच ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरु आहे.
श्रावण सोमवारनिमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर गावातील एक कुटुंबीय देवदर्शनासाठी दक्षिण भारतात गेले होते. देवदर्शन आटोपून घराकडे परत येत असताना गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद येथे काळाने घाला घातला.
(PRAHAAR)