X Close
X
9819022904

गडकरींना पाच लाखांहून अधिक मतांनी हरवणार : नाना पटोले


ngg
नागपूर : लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल आल्यानंतर काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांनी मोठा दावा केला. मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पाच लाख मतांनी पराभव होईल. माझाच विजय होणार असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, देशभरात मोदी सरकारविरोधात वातावरण होते. नागपूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास येथेही लोकांच्या मनात सरकारबाबत नाराजी होती. नागपूर शहरात काँग्रेसच्या बाजूने मतदान झाले आहे. त्यामुळे प्रचाराच्या आधी म्हटल्याप्रमाणे मी पाच लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार आहे. एक्झिट पोल हे चुकीच्या पद्धतीने दाखवले जातात. जनतेचा अशा पोलवर विश्वास नाही. या लोकसभा निवडणुकीत देशात सत्तापरिवर्तन झाले आहे. तसेच निकालांनंतर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला. (PRAHAAR)